प्रस्तुत पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी भारताच्या प्राचीन इतिहासाचे व पुरातन कालापासून आधुनिक कालापर्यंत भारतात प्रचलित असलेल्या विभिन्न प्रकारच्या शासनपद्धतींचे चित्र रेखाटले असून भारताची अवनती ज्या कारणांमुळे झाली त्या कारणांचेही दिग्दर्शन केले आहे. तसेच, भारताची राष्ट्रीय ध्येये कोणती आहेत व त्यांच्यावर भर दिल्याने आणि ती कृतीत आणल्याने भारतभूमीचे पुनरुत्थान कसे होऊ शकते याचेही स्वामीजींनी प्रस्तुत पुस्तकात आकर्षक पद्धतीने वर्णन केले आहे. पाश्चात्त्यांपासून इष्ट ते घेऊन, परंतु त्यांचे अंधानुकरण न करता भारतीय आदर्शानुसार जेव्हा ‘खरी माणसे’ निर्माण होतील तेव्हाच भारताचा खराखुरा विकास होईल व भारत प्रगतिपथावर अधिकाधिक पुढे जाईल या सत्याचे स्वामीजींनी प्रस्तुत पुस्तकात मूलग्राही विवेचन केले असून त्यावरून वाचकांना त्यांच्या दूरदृष्टीचा व अलौकिक प्रतिभेचा प्रत्यय येईल. आधुनिक भारताची सर्वांगीण उन्नती घडवून आणण्यासाठी प्रस्तुत पुस्तकातील स्वामीजींचे प्रभावी विचार निश्चितच लाभदायक ठरतील.
Author Swami Vivekananda
Translated by Prof. L. K. Aravakar
Publisher Ramakrishna Math, Nagpur
Adhunik Bharat (आधुनिक भारत)
- Product Code: M-5215
- Availability: 76
-
Rs.15.00