Product Details
प्रस्तुत पुस्तकात भगवान श्रीरामचंद्रांच्या अमर उपदेशांचे संकलन आहे. हे उपदेश वाल्मीकि रामायण, अध्यात्म रामायण इत्यादी ग्रंथांवर आधारलेले असून त्यांच्यापासून असंख्य भक्तांना स्फूर्ती प्राप्त होत आली आहे. भगवान श्रीरामचंद्रांना ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात. सर्व दृष्टींनी त्यांचे दिव्य जीवन आदर्श असून दैनंदिन जीवनाला कसा आकार द्यावा हे त्यांच्या जीवनावरून आपल्याला कळून येते. त्यांनी जगासमोर ‘रामराज्या’चा आदर्श ठेवला आहे आणि जनता सुखी होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे हे स्वत:च्या जीवनाने त्यांनी दर्शवून दिले आहे. त्यांचे उपदेश हजारो वर्षांपूर्वी दिले गेले असले तरी आजही त्यांचा टवटवीतपणा व त्यातील शक्ती कायम आहे.